मानसिक परिपूर्णत्व – १५
आत्मप्रकाशाशी आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधी मी जे बोलत होतो त्यामध्ये, मी तुमच्या गतायुष्यातील कोणत्या गोष्टीविषयी किंवा तुमच्यामधील एखाद्या उणिवेविषयी बोलत नव्हतो. तर सर्व संघर्षामध्ये, हल्ल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या एका गोष्टीकडे निर्देश करत होतो – सत्यप्रकाशाला, सत्याच्या हाकेला विरोध करणाऱ्या कोणत्याही सूचना, आवेग, प्रलोभन यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्याच्या आवश्यकतेकडे, मी निर्देश करत होतो. सर्व शंकाकुशंका आणि निराशेच्या वेळी असे म्हणावे की, ”मी ईश्वराचा आहे, मी अपयशी होऊ शकणार नाही.” अशुद्धतेच्या आणि अपात्रतेच्या सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, ”मी ईश्वराने निवडलेले अमर्त्यतेचे बालक आहे. मी फक्त माझ्याशी आणि ईश्वराशी प्रामाणिक असावयास हवे, तर विजय निश्चित आहे; अगदी मी जरी पडलो, धडपडलो तरी मी खात्रीने पुन्हा उभा राहीन.” कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करण्यासाठी, या उच्च्तर ध्येयापासून दूर जाऊ पाहणाऱ्या सर्व आवेगांना उत्तर द्यावे की, “हे सर्वात महान असे ध्येय आहे. माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे समाधान करू शकेल असे हे एकमेव सत्य आहे; या दिव्यत्वाच्या प्रवासामध्ये कितीही परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने ध्येयापर्यंत पोहोचेनच.” ‘प्रकाशाशी आणि हाकेशी एकनिष्ठता’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा होता.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 99)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…