मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा या सृष्टीच्या निर्मितीमधील शेवटचा टप्पा नाही किंवा मानवी शक्यतेचा देखील तो शेवटचा टप्पा नाही. मानवी मन आज बौद्धिक, वैचारिक मनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु या मनाच्या पलीकडे जात मनुष्य हा, उच्च मन (Higher Mind), प्रकाशित मन (Illumined Mind), अंतःस्फूर्त मन (Intuitive Mind), अधिमानस (Overmind) येथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो,’ असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्याला सांगितले आहे. या प्रत्येक स्तरावरील बारकावे त्यांनी उलगडून दाखविले आहेत.
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे अतिमानस-चेतनेचे (Supremental Consciousness) आविष्करण घडून आले. पण व्यापक जनसमूहाला त्याचा लाभ व्हायचा असेल तर, व्यापक जनसमूहाने उच्चतर चेतनेच्या (Higher Consciousness) पातळ्यांवर चढून जाणे आवश्यक आहे.
उच्चतर चेतनेचे मानवी चेतनेवर जे कार्य चालते त्यातील काही पैलूंना आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘उच्चतर चेतना’ या मालिकेमध्ये स्पर्श करणार आहोत.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…
जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी…