विचार-कणिका
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.
*
आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्याविषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- उन्मुखता आणि प्रगती - August 19, 2026
- पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त - August 18, 2026
- योगाभ्यासामधील प्रमुख गोष्ट - August 17, 2026





