Entries by श्रीअरविंद

दोन आंतरिक आदर्श

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१८) मनुष्याला ज्या आदर्शांचे अनुसरण करणे शक्य आहे असे दोन आंतरिक आदर्श आहेत. पहिला आहे सामान्य मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि दुसरा आहे ‘योगमार्गा’चा दिव्य आदर्श. ..आपल्या समग्र अस्तित्वावर सुस्पष्ट, सशक्त व तर्कशुद्ध मनाचे आणि योग्य व तर्कशुद्ध इच्छाशक्तीचे नियंत्रण प्रस्थापित करणे; आपल्या भावनिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वावर प्रभुत्व संपादन करणे; आपल्या समग्र […]

दिव्य चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचा मार्ग

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१७) ‘दिव्य’ चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्यपूर्ण सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून त्या ‘ईश्वरा’प्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती त्या ‘ईश्वरा’विषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की त्या ‘ईश्वरा’प्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान […]

चेतनेच्या दोन अवस्था

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६) चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते […]

समता-भाव

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१५) व्यक्तीला जेव्हा सामान्य नोकरीव्यवसायात आणि सामान्य परिस्थितीमध्ये राहून जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यक्तीने संपूर्ण समत्व व अनासक्ती बाळगली पाहिजे; तसेच ‘ईश्वर’ आहे आणि आत्ता जरी सर्व गोष्टी ‘अज्ञान’मय जगताच्या परिस्थितीमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्येसुद्धा ‘ईश्वरी संकल्प’ कार्यकारी आहे या श्रद्धेनिशी व्यक्तीने भगवद्गीतेमधील समता-भावाची जोपासना केली […]

विवाह आणि साधकजीवन

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४) (एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…) आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, […]

सांसारिक जीवन – अनुभवाचे क्षेत्र

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१३) उच्चतर चेतनेमध्ये उन्नत होणे आणि केवळ सामान्य प्रेरणांनिशी नव्हे तर, त्या उच्चतर चेतनेमध्ये राहून जीवन जगणे हे, येथे (श्रीअरविंद आश्रमामध्ये) आचरल्या जाणाऱ्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चेतनेच्या परिवर्तनाप्रमाणेच जीवनाचे परिवर्तनही अपेक्षित आहे. सामान्य जीवनापासून संबंध तोडता येतील अशी परिस्थिती सर्वांनाच उपलब्ध असते असे नाही; आणि म्हणून अनुभवाचे एक क्षेत्र आणि साधनेतील प्राथमिक […]

पूर्णयोगाची मागणी

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१२) तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्य’शोधनाच्या अभीप्सेसाठी आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याच्या अभीप्सेसाठी पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही या योगाची (पूर्णयोगाची) मागणी आहे. तुमचे जीवन (एकीकडे) ‘ईश्वरा’मध्ये आणि (दुसरीकडे) ज्या गोष्टीचा ‘सत्या’च्या शोधनाशी काहीही संबंध नाही अशा कोणत्यातरी बाह्य ध्येयामध्ये आणि कार्यामध्ये विभागणे या गोष्टीला येथे मान्यता नाही. […]

पूर्णयोगाचे ध्येय

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०) केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये […]

पूर्णयोगाचे उद्दिष्ट

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९) ‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव […]

पूर्णयोगाचे तत्त्व

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८) (१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या […]