श्रीमाताजी आणि समीपता – ०३
साधक : प्रत्येकाला जे काही आवश्यक असते ते श्रीमाताजी त्याला देत असतात. एखाद्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती स्वीकारण्याची त्याची क्षमतादेखील आहे अशा व्यक्तीला श्रीमाताजी त्या गोष्टीपासून कधीही वंचित ठेवत नाहीत. आम्ही मात्र असे आहोत की त्या जे देतात, ते ग्रहण करण्याची आमची तयारी नसते.
श्रीअरविंद : हो, श्रीमाताजी (त्यांच्या लेकरांना) देण्यासाठी नेहमीच राजी असतात आणि त्या जे देऊ इच्छितात ते जर लेकरांनी ग्रहण केले तर, तसा आनंद श्रीमाताजींना अन्य कोणत्याच गोष्टींनी मिळत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…