श्रीमाताजी आणि समीपता – ०४
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
‘आई आणि मूल’ यांच्यातील ‘प्रेम’ याचा अर्थ फक्त आईनेच मुलावर प्रेम केले पाहिजे असा होत नाही तर, मुलानेसुद्धा आईवर प्रेम केले पाहिजे आणि तिची आज्ञा पाळली पाहिजे असा होतो. तुम्हाला ‘श्रीमाताजीं’चे खरे बालक व्हायचे आहे, पण त्यासाठी प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे तर ती म्हणजे, तुम्ही स्वतःला त्यांच्या हाती सोपविले पाहिजे; म्हणजे मग त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार आचरण केले पाहिजे आणि त्या इच्छेकडे दुर्लक्ष करता कामा नये किंवा श्रीमाताजींच्या विरोधात बंडही पुकारता कामा नये. तुम्हाला हे सारे व्यवस्थित माहीत असूनसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का करत आहात?
बालकाचा प्राण ज्याची मागणी करतो (म्हणजे त्याच्या प्राणिक इच्छावासना ज्याची मागणी करतात), त्या मागणीची पूर्तता न करणे, हा सुजाण मातेच्या प्रेमाचाच एक भाग असतो; कारण तिला हे माहीत असते की, बालकाच्या प्राणाची ती मागणी पुरविणे हे त्याच्यासाठी अतिशय वाईट ठरू शकते.
(मथितार्थ असा की) तुमच्या प्राणावेगाच्या आज्ञा पाळू नका, तर तुम्हाला झालेल्या खऱ्या बोधाचे अनुसरण करा आणि स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेचे माध्यम बनवा. कारण तुम्ही तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये उन्नत व्हावे हीच श्रीमाताजींची नेहमी इच्छा असते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…