श्रीमाताजी आणि समीपता – ०२
साधक : श्रीमाताजींबरोबरचे आमचे खरे नाते कोणते? माता आणि बालक हेच नाते खरे ना?
श्रीअरविंद : एखादे बालक मातेवर ज्याप्रमाणे संपूर्णतया, प्रामाणिकपणे आणि साध्यासुध्या विश्वासाने, प्रेमाने विसंबून असते तेच नाते हे श्रीमाताजींबरोबर असलेले खरे नाते होय.
*
तुम्ही श्रीमाताजींचे बालक आहात आणि मातेचे तिच्या बालकांवर अतोनात प्रेम असते आणि त्यांच्या प्रकृतीमधील दोष ती धीराने सहन करत राहते. श्रीमाताजींचे खरेखुरे बालक होण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यामध्ये आहे, पण तुमचे बाह्य मन व्यर्थपणे किरकोळ गोष्टींमध्ये गुंतलेले राहते आणि बरेचदा उगाचच तुम्ही त्या गोष्टींचा बाऊ करत बसता. श्रीमाताजींचे दर्शन तुम्ही फक्त स्वप्नातच घेता कामा नये तर, त्यांना तुमच्यासमवेत आणि तुमच्या अंतरंगात सदासर्वकाळ पाहण्याचा आणि त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सोपे जाईल. कारण त्या तेथे (तुमच्या अंतरंगात) राहून तुमच्यासाठी ती गोष्ट करू शकतील.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 448, 452-453)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…