साधना, योग आणि रूपांतरण – १५९
पूर्णयोगांतर्गत भक्ती
(मानवी स्तरावरील सामान्य प्रेम आणि दिव्य प्रेम यातील फरक येथे स्पष्ट केला आहे.)
प्रेम हे शुष्क, भावनारहित असू शकत नाही. कारण अशा प्रकारचे प्रेम अस्तित्वातच नसते, आणि श्रीमाताजी ज्या प्रेमाविषयी सांगतात ते प्रेम ही एक अगदी विशुद्ध, अचल आणि नित्य गोष्ट असते. …ते प्रेम सूर्यप्रकाशासारखे स्थिर, सर्वसमावेशक, स्वयंभू असते.
वैयक्तिक असे दिव्य प्रेम सुद्धा असते. परंतु ते व्यक्तिगत मानवी प्रेमाप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या परतफेडीवर अवलंबून नसते. ते वैयक्तिक असते पण अहंभावात्मक नसते. एका सत् अस्तित्वाकडून (real being) दुसऱ्या सत् अस्तित्वाकडे ते प्रवाहित होत असते. पण तसे प्रेम लाभण्यासाठी, (व्यक्ती) सामान्य मानवी दृष्टिकोनातून मुक्त होणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 344-345)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…