साधना, योग आणि रूपांतरण – १५८
पूर्णयोगांतर्गत भक्ती
भक्तीने व्याकुळ होऊन अश्रुधारा वाहू लागतात त्याविषयी श्रीअरविंद एका पत्रात लिहितात की, आंतरिक अभीप्सेमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा त्या अश्रूंना रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु जर ते प्राणिक असतील, वरपांगी असतील, अगदी वरवरचे असतील तर तेव्हा मात्र ते अश्रू म्हणजे भावनिक अव्यवस्थेची आणि क्षोभाची कृती ठरते. प्रार्थनेच्या उत्कटतेला अजिबात नकार देऊ नये; अशाप्रकारची प्रार्थना ही योगसाधनेच्या सर्वात शक्तिशाली माध्यमांपैकी एक असते.
*
फक्त सामान्य प्राणिक भावनांमुळेच (vital emotions) शक्तिव्यय होतो आणि त्यामुळे तुमची एकाग्रता आणि शांती भंग पावते, म्हणून अशा प्राणिक भावनांना प्रोत्साहन देता कामा नये. मुळात भावना ही काही वाईट गोष्ट नाही; भावना म्हणजे प्रकृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि आंतरात्मिक भावना (psychic emotion) ही तर साधनेला साहाय्यकारी होणाऱ्या गोष्टींमधील एक सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. आंतरात्मिक भावनेमुळे ‘ईश्वरा’ बद्दलच्या प्रेमामुळे अश्रू येतात किंवा कधी आनंदाश्रू येतात; असे अश्रू अडवता कामा नयेत. त्यामध्ये प्राणिक भावनांची भेसळ झाली तर मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 362), (CWSA 29 : 351)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…