साधना, योग आणि रूपांतरण – १५८
पूर्णयोगांतर्गत भक्ती
भक्तीने व्याकुळ होऊन अश्रुधारा वाहू लागतात त्याविषयी श्रीअरविंद एका पत्रात लिहितात की, आंतरिक अभीप्सेमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा त्या अश्रूंना रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु जर ते प्राणिक असतील, वरपांगी असतील, अगदी वरवरचे असतील तर तेव्हा मात्र ते अश्रू म्हणजे भावनिक अव्यवस्थेची आणि क्षोभाची कृती ठरते. प्रार्थनेच्या उत्कटतेला अजिबात नकार देऊ नये; अशाप्रकारची प्रार्थना ही योगसाधनेच्या सर्वात शक्तिशाली माध्यमांपैकी एक असते.
*
फक्त सामान्य प्राणिक भावनांमुळेच (vital emotions) शक्तिव्यय होतो आणि त्यामुळे तुमची एकाग्रता आणि शांती भंग पावते, म्हणून अशा प्राणिक भावनांना प्रोत्साहन देता कामा नये. मुळात भावना ही काही वाईट गोष्ट नाही; भावना म्हणजे प्रकृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि आंतरात्मिक भावना (psychic emotion) ही तर साधनेला साहाय्यकारी होणाऱ्या गोष्टींमधील एक सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. आंतरात्मिक भावनेमुळे ‘ईश्वरा’ बद्दलच्या प्रेमामुळे अश्रू येतात किंवा कधी आनंदाश्रू येतात; असे अश्रू अडवता कामा नयेत. त्यामध्ये प्राणिक भावनांची भेसळ झाली तर मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 362), (CWSA 29 : 351)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…