उच्चतर चेतनेची शांती जेव्हा अवतरित होते तेव्हा ती नेहमीच तिच्यासोबत समतेची प्रवृत्ती देखील घेऊन येते. कारण कनिष्ठ प्रकृतीच्या लाटांकडून, समतेविना असलेल्या शांतीवर आघात होण्याचा नेहमीच धोका संभवतो.
*
मानसिक चेतनेप्रमाणेच तुम्ही प्राणिक आणि शारीरिक चेतनेमध्येही समत्व आणि स्थिरतेचा दृढ पाया निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तुमच्यामध्ये ‘शक्ती’ आणि ‘आनंदा’चा पूर्ण प्रवाह अवतरित होऊ दे, परंतु तो प्रवाह धारण करता येईल अशा दृढ आधारामध्येच शक्ती आणि आनंद अवतरित व्हायला हवेत. आणि आधाराच्या (शरीर, प्राण, मन) ठायी ही क्षमता आणि दृढता परिपूर्ण समत्वामधूनच येते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 128, 127)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…