प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ?
श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता.
दुसरे म्हणजे शरीरातील समत्व. हे मानसिक समत्व नसते, तर ते काहीसे भौतिक, शारीरिक समत्व असते; म्हणजे ती अशी एक शारीरिक संतुलनाची स्थिती असते की, ज्यामुळे व्यक्ती कोणताही त्रास न होता, शक्तींचे ग्रहण करू शकते.
व्यक्तीला जर या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर या दोन्ही समत्वांची सारखीच आवश्यकता असते. आणि त्याशिवाय इतरही काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ, मनाची बैठक. सर्व प्रकारच्या कल्पना, अगदी परस्परविरोधी का असेनात, सर्व बाजूंनी येत राहतात आणि तरीदेखील व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नाही अशी स्थिती म्हणजे मनाची बैठक. व्यक्ती त्या कल्पना पाहू शकते आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य स्थानी ठेवू शकते. ती असते मनाची बैठक.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…