समर्पण – ५४
कोणताच मार्ग हा पूर्णतः सोपा नसतो आणि समर्पणाच्या मार्गाबाबत सांगायचे तर, खरेखुरे आणि संपूर्ण समर्पण करणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. परंतु एकदा का ते घडून आले की मग त्यामुळे गोष्टी निश्चितपणे अधिक सोप्या होतात – म्हणजे या साऱ्या गोष्टी क्षणार्धात घडून येतात असे नाही किंवा अडीअडचणी नाहीशा होतात असेही नाही; पण तेथे एक प्रकारची आश्वासकता असते, एक आधार असतो, आणि एक तणावरहितता असते की जी प्रतिकाराच्या वाईटातल्या वाईट रूपांपासून स्वातंत्र्य प्रदान करते आणि चेतनेला शांती तसेच सामर्थ्य प्रदान करते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 81-82)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…