समर्पण – ५७
प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल?
श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, बघू या.” तेव्हा हा तुमचा आरंभबिंदू असतो.
अजून एक छोटासा प्रयोग लक्षात घेऊ : समजा ईश्वर ठरविणार आहे की, अमुक अमुक गोष्ट घडणार आहे आणि नेमकी ती तुमच्या भावनांच्या विरोधात जाणारी असेल. तर अशा वेळी व्यक्ती स्वत:लाच म्हणते, “जर ईश्वराने मला, ‘तू अमुक अमुक गोष्ट सोडून द्यायची आहे’ असे सांगितले तर?…’’ – तुमची प्रतिक्रिया काय होते ते लगेच पाहा, तुम्हाला स्पष्टपणे कळून चुकेल; जर त्यामुळे आतमध्ये काहीतरी टोचणी लागली असेल तर तुम्ही स्वत:ला असे सांगू शकता, “समर्पण अजून परिपूर्ण झालेले नाही” – कारण आत कोठेतरी रुखरुख लागलेली आहे, आत काहीतरी ठुसठुसत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 345-346)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…