समर्पण – ५७
प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल?
श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, बघू या.” तेव्हा हा तुमचा आरंभबिंदू असतो.
अजून एक छोटासा प्रयोग लक्षात घेऊ : समजा ईश्वर ठरविणार आहे की, अमुक अमुक गोष्ट घडणार आहे आणि नेमकी ती तुमच्या भावनांच्या विरोधात जाणारी असेल. तर अशा वेळी व्यक्ती स्वत:लाच म्हणते, “जर ईश्वराने मला, ‘तू अमुक अमुक गोष्ट सोडून द्यायची आहे’ असे सांगितले तर?…’’ – तुमची प्रतिक्रिया काय होते ते लगेच पाहा, तुम्हाला स्पष्टपणे कळून चुकेल; जर त्यामुळे आतमध्ये काहीतरी टोचणी लागली असेल तर तुम्ही स्वत:ला असे सांगू शकता, “समर्पण अजून परिपूर्ण झालेले नाही” – कारण आत कोठेतरी रुखरुख लागलेली आहे, आत काहीतरी ठुसठुसत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 345-346)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…