समर्पण – ५०
परिपूर्ण असा आत्म-समर्पणाचा दृष्टिकोन अगदी थोड्या प्रमाणात जरी प्रस्थापित करता आला तरी, योग-क्रियांची सारी आवश्यकता अपरिहार्यपणे संपुष्टात येते. कारण तेव्हा आपल्या अंतर्यामीचा ‘देव’ स्वतःच साधक आणि सिद्ध बनतो आणि त्याची दिव्य शक्ती आपल्यामध्ये कार्य करते,… अगदी सर्वाधिक शक्तिशाली राजयोगांतर्गत संयम, सर्वाधिक विकसित प्राणायाम, अत्यंत कठोर ध्यान, अतीव आनंददायी ‘भक्ती’, आत्म-त्यागाची कृती; या साऱ्या गोष्टी एरवी खूपच बलशाली आणि परिणामकारक असतात; परंतु त्या सुद्धा देव कार्याच्या तुलनेत परिणामांच्या दृष्टीने अगदीच क्षीण ठरतात. कारण या साऱ्या गोष्टींवर आपल्या क्षमतेच्या विशिष्ट मर्यादा पडतात, परंतु हे देव कार्य मात्र सामर्थ्याच्या बाबतीत अमर्याद असते कारण ती ‘देवा’ची क्षमता असते. या विश्वासाठी व विश्वातील आपल्या प्रत्येकासाठी आणि त्याव्यतिरिक्त इतरांसाठी देखील सर्वोत्तम काय आहे हे ज्या इच्छेला ज्ञात असते, अशा ईश्वरी इच्छेनेच केवळ ते कार्य परिमित (limited) होते.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…