समर्पण – ५१
स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न करता, त्या शक्तीला कार्य करू देणे; ज्ञान प्रदान केले जाते तेव्हा ते स्वीकारणे आणि त्याचे अनुसरण करणे; ‘ईश्वरी इच्छा’ प्रकट केली जाते तेव्हा स्वतःला त्या इच्छेचे साधन बनवणे; हा समर्पणाचा गाभा आहे. ‘ईश्वर’ नेतृत्व करू शकतो, पण तो व्यक्तीला चालवत नाही. प्रत्येक मनोमय जीवाला म्हणजे ज्याला ‘मनुष्य’ असे संबोधले जाते अशा प्रत्येक व्यक्तीला एक आंतरिक स्वातंत्र्य असते; आपले नेतृत्व करण्याची अनुमती त्या ‘ईश्वरी नेतृत्वा’ला द्यायची की द्यायची नाही, हे ठरविण्याचे आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला असते. तसे नसेल तर खरी आध्यात्मिक उत्क्रांती कशी काय शक्य होईल?
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67-68)
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'संन्यासाश्रम' ही संकल्पना जाणून घेऊ.)…
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'वानप्रस्थाश्रम' ही संकल्पना जाणून…
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज 'गृहस्थाश्रम' ही संकल्पना जाणून घेऊ.)…
(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत.…
प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते. * निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे. • श्रीमाताजी…
तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक…