समर्पण – ५१
स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न करता, त्या शक्तीला कार्य करू देणे; ज्ञान प्रदान केले जाते तेव्हा ते स्वीकारणे आणि त्याचे अनुसरण करणे; ‘ईश्वरी इच्छा’ प्रकट केली जाते तेव्हा स्वतःला त्या इच्छेचे साधन बनवणे; हा समर्पणाचा गाभा आहे. ‘ईश्वर’ नेतृत्व करू शकतो, पण तो व्यक्तीला चालवत नाही. प्रत्येक मनोमय जीवाला म्हणजे ज्याला ‘मनुष्य’ असे संबोधले जाते अशा प्रत्येक व्यक्तीला एक आंतरिक स्वातंत्र्य असते; आपले नेतृत्व करण्याची अनुमती त्या ‘ईश्वरी नेतृत्वा’ला द्यायची की द्यायची नाही, हे ठरविण्याचे आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला असते. तसे नसेल तर खरी आध्यात्मिक उत्क्रांती कशी काय शक्य होईल?
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67-68)
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…