समर्पण – ३६
उद्भवणाऱ्या साऱ्या अडीअडचणी या खुद्द प्रकृतीमध्येच असतील तर, त्यांनी पृष्ठभागावर यावे आणि स्वतःला आविष्कृत करावे हे अटळ आहे. समर्पण ही काही सोपी गोष्ट नाही, त्याला प्रकृतीच्या एका मोठ्या भागाकडून विरोध केला जातो. जर मनाने समर्पणाची इच्छा धरली तर, हे सारे आंतरिक अडथळे येऊन स्वतःचे अस्तित्व दाखविणार हे उघडच आहे; अशा वेळी साधकाने त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त केले पाहिजे, त्याने त्याच्या प्रकृतीतून या अडथळ्यांना दूर लोटले पाहिजे आणि त्यावर मात केली पाहिजे. याला पुष्कळ काळदेखील लागू शकेल पण हे केलेच पाहिजे. व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमध्येच समर्पणाला विरोध असतो आणि या विरोधाची साथ बाह्य अडथळ्यांना मिळते.
या विरोधाची अशी साथ जर त्या बाह्य अडथळ्यांना मिळाली नाही तर मग मात्र ते बाह्य अडथळे आंतरिक समर्पण रोखू शकत नाहीत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…