समर्पण – ३५
प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे?
श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, एखाद्या अजाण बालकाबाबत व्यक्ती जसे करते, त्याप्रमाणे सर्व मार्गांचा अवलंब करा – चित्रं, स्पष्टीकरणं, प्रतीकं यांचा वापर करा. व्यक्तित्वाच्या इतर भागांसोबत सुमेळ आणि ऐक्याची आवश्यकता काय आहे हे त्यांना समजावून सांगा; त्यांना तर्काने पटवून द्या, त्यांना त्यांच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय धीराने वागा; एकच गोष्ट पुन्हापुन्हा करण्याचा कंटाळा करू नका, थकू नका.
प्रश्न : या कार्यामध्ये मनाची काही मदत होऊ शकते का?
श्रीमाताजी : हो, जर मनाचा एखादा भाग हा पूर्ण प्रकाशित झालेला असेल, जर तो चैत्य प्रकाशाप्रत समर्पित झालेला असेल आणि जर त्याला सत्याची जाणीव झालेली असेल तर असे मन हे खूपच साहाय्यकारी ठरू शकते, असे मन गोष्टींचे खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण करू शकते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 182-183)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…