समर्पण – ३५
प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे?
श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, एखाद्या अजाण बालकाबाबत व्यक्ती जसे करते, त्याप्रमाणे सर्व मार्गांचा अवलंब करा – चित्रं, स्पष्टीकरणं, प्रतीकं यांचा वापर करा. व्यक्तित्वाच्या इतर भागांसोबत सुमेळ आणि ऐक्याची आवश्यकता काय आहे हे त्यांना समजावून सांगा; त्यांना तर्काने पटवून द्या, त्यांना त्यांच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय धीराने वागा; एकच गोष्ट पुन्हापुन्हा करण्याचा कंटाळा करू नका, थकू नका.
प्रश्न : या कार्यामध्ये मनाची काही मदत होऊ शकते का?
श्रीमाताजी : हो, जर मनाचा एखादा भाग हा पूर्ण प्रकाशित झालेला असेल, जर तो चैत्य प्रकाशाप्रत समर्पित झालेला असेल आणि जर त्याला सत्याची जाणीव झालेली असेल तर असे मन हे खूपच साहाय्यकारी ठरू शकते, असे मन गोष्टींचे खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण करू शकते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 182-183)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…