समर्पण – ३५
प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे?
श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, एखाद्या अजाण बालकाबाबत व्यक्ती जसे करते, त्याप्रमाणे सर्व मार्गांचा अवलंब करा – चित्रं, स्पष्टीकरणं, प्रतीकं यांचा वापर करा. व्यक्तित्वाच्या इतर भागांसोबत सुमेळ आणि ऐक्याची आवश्यकता काय आहे हे त्यांना समजावून सांगा; त्यांना तर्काने पटवून द्या, त्यांना त्यांच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय धीराने वागा; एकच गोष्ट पुन्हापुन्हा करण्याचा कंटाळा करू नका, थकू नका.
प्रश्न : या कार्यामध्ये मनाची काही मदत होऊ शकते का?
श्रीमाताजी : हो, जर मनाचा एखादा भाग हा पूर्ण प्रकाशित झालेला असेल, जर तो चैत्य प्रकाशाप्रत समर्पित झालेला असेल आणि जर त्याला सत्याची जाणीव झालेली असेल तर असे मन हे खूपच साहाय्यकारी ठरू शकते, असे मन गोष्टींचे खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण करू शकते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 182-183)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…