समर्पण – ३१
आपण आपल्या या योगामध्ये, संपूर्ण समर्पणाच्या संकल्पनेपासून, समर्पणाच्या संकल्पापासून, समर्पणाच्या अभीप्सेपासून प्रारंभ करतो, परंतु त्याच वेळी आपण कनिष्ठ प्रकृतीला नकारसुद्धा द्यायचा असतो, आपली चेतना त्या कनिष्ठ प्रकृतीपासून मोकळी करावयाची असते. कनिष्ठ प्रकृतीमध्ये गुंतून पडलेला आपला जीव हा उच्चतर प्रकृतीच्या स्वातंत्र्याप्रत आत्मोन्नती करून,आपण मोकळा करायचा असतो.जर आपण ही दुहेरी प्रक्रिया केली नाही तर, आपण तामसिक आणि त्यामुळे खोटे समर्पण करण्याचा, किंवा कोणताही प्रयत्नच न करण्याचा, कोणतेही तप न करण्याचा आणि पर्यायाने आपली कोणतीही प्रगती न होण्याचा धोका असतो; किंवा आपण ईश्वराप्रत नव्हे तर, स्वयं-रचित अशा कोणत्यातरी मिथ्या संकल्पनेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते अथवा आपण ईश्वराच्या अशा एखाद्या मिथ्या प्रतिमेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते की, जी आपला राजसिक अहंकार वा त्याहूनही एखादी वाईट गोष्ट दडवून ठेवते.
– श्रीअरविंद
(CWSA 29:442)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…