समर्पण – ३१
आपण आपल्या या योगामध्ये, संपूर्ण समर्पणाच्या संकल्पनेपासून, समर्पणाच्या संकल्पापासून, समर्पणाच्या अभीप्सेपासून प्रारंभ करतो, परंतु त्याच वेळी आपण कनिष्ठ प्रकृतीला नकारसुद्धा द्यायचा असतो, आपली चेतना त्या कनिष्ठ प्रकृतीपासून मोकळी करावयाची असते. कनिष्ठ प्रकृतीमध्ये गुंतून पडलेला आपला जीव हा उच्चतर प्रकृतीच्या स्वातंत्र्याप्रत आत्मोन्नती करून,आपण मोकळा करायचा असतो.जर आपण ही दुहेरी प्रक्रिया केली नाही तर, आपण तामसिक आणि त्यामुळे खोटे समर्पण करण्याचा, किंवा कोणताही प्रयत्नच न करण्याचा, कोणतेही तप न करण्याचा आणि पर्यायाने आपली कोणतीही प्रगती न होण्याचा धोका असतो; किंवा आपण ईश्वराप्रत नव्हे तर, स्वयं-रचित अशा कोणत्यातरी मिथ्या संकल्पनेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते अथवा आपण ईश्वराच्या अशा एखाद्या मिथ्या प्रतिमेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते की, जी आपला राजसिक अहंकार वा त्याहूनही एखादी वाईट गोष्ट दडवून ठेवते.
– श्रीअरविंद
(CWSA 29:442)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…