समर्पण – ३२
आंतरिक प्रयत्न आणि संघर्ष यांचा कमीअधिक दीर्घ असा कालावधी असतो की ज्यामध्ये, व्यक्तिगत इच्छेने अंधकाराला आणि कनिष्ठ प्रकृतीच्या विकृतींना नकार दिला पाहिजे आणि निर्धारपूर्वक किंवा जोरकसपणे स्वतःला दिव्य प्रकाशाच्या बाजूला ठेवले पाहिजे. सर्व मानसिक ऊर्जा, हृदयाच्या भावना, प्राणिक इच्छावासना, तसेचअगदी शारीर अस्तित्वाला देखील योग्य दृष्टिकोन स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे किंवा या साऱ्यांनी योग्य प्रभावाला प्रतिसाद द्यावा आणि त्या प्रभावाचा स्वीकार करावा यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. तेव्हाच, म्हणजे जेव्हा हे खऱ्या अर्थाने केले जाईल तेव्हाच, कनिष्ठाचे उच्चतर प्रकृतीप्रत केलेले समर्पण सिद्ध होईल…
-श्रीअरविंद
(CWSA 23 : 60)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…