समर्पण – ३२
आंतरिक प्रयत्न आणि संघर्ष यांचा कमीअधिक दीर्घ असा कालावधी असतो की ज्यामध्ये, व्यक्तिगत इच्छेने अंधकाराला आणि कनिष्ठ प्रकृतीच्या विकृतींना नकार दिला पाहिजे आणि निर्धारपूर्वक किंवा जोरकसपणे स्वतःला दिव्य प्रकाशाच्या बाजूला ठेवले पाहिजे. सर्व मानसिक ऊर्जा, हृदयाच्या भावना, प्राणिक इच्छावासना, तसेचअगदी शारीर अस्तित्वाला देखील योग्य दृष्टिकोन स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे किंवा या साऱ्यांनी योग्य प्रभावाला प्रतिसाद द्यावा आणि त्या प्रभावाचा स्वीकार करावा यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. तेव्हाच, म्हणजे जेव्हा हे खऱ्या अर्थाने केले जाईल तेव्हाच, कनिष्ठाचे उच्चतर प्रकृतीप्रत केलेले समर्पण सिद्ध होईल…
-श्रीअरविंद
(CWSA 23 : 60)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…