समर्पण – २८
मनाद्वारे आणि इच्छाशक्तीद्वारेदेखील समर्पण करता येणे शक्य असते हे योगिक अनुभव दाखवून देतो; स्वच्छ आणि प्रामाणिक मनाला समर्पणाची आवश्यकता लक्षात येते आणि मग स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छाशक्ती ही अवज्ञाकारी अंगांना समर्पण करण्यास प्रवृत्त करू शकते. अनुभवामधून असेही लक्षात येते की, प्रेमामधून समर्पणाचा उदय होतो असेच केवळ नाही तर उलटपक्षी, समर्पणाद्वारेही प्रेमाचा उदय होऊ शकतो. किंवा समर्पणासोबत अपूर्ण प्रेम हे परिपूर्ण प्रेमामध्ये वृद्धिंगत होऊ शकते. व्यक्ती ईश्वराला जाणण्याच्या किंवा त्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या अगदी उत्कट कल्पनेने किंवा इच्छेने आरंभ करते आणि मग ती स्वतःच्या सर्वसामान्य वैयक्तिक कल्पना, इच्छाआकांक्षा, आसक्ती, कर्म करण्याच्या प्रेरणा, कृतींच्या सवयी इ. साऱ्या गोष्टी ईश्वराने हाती घ्याव्यात म्हणून त्या सर्व गोष्टींचे अधिकाधिक समर्पण करते.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 385)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…