समर्पण – २९
समर्पणाबद्दलच्या नुसत्या चर्चा किंवा निव्वळ कल्पना किंवा उत्कटतेचा अभाव असलेली आत्मनिवेदनाची अर्धवट इच्छा या गोष्टी काही कामाच्या नाहीत; आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तनासाठी लागणारा एक प्रकारचा जोर तिथे असला पाहिजे. केवळ मानसिक दृष्टिकोन स्वीकारून (समर्पण) ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही किंवा बाह्य पुरुषाला तो जसा आहे त्या अवस्थेत तसाच सोडून देणाऱ्या असंख्य आंतरिक अनुभवांनीदेखील ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही. या बाह्य पुरुषाने ईश्वराप्रत उन्मुख झाले पाहिजे, त्याला समर्पित झाले पाहिजे आणि परिवर्तित झाले पाहिजे. त्याने त्याचे अगदी लहानातले लहान स्पंदन, सवय, कृती यांचे समर्पण केले पाहिजे, त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट उचलून, दिव्य प्रकाशाप्रत खुली केली पाहिजे. जेणेकरून त्या गोष्टीची जुनी रूपं आणि उद्देश नाहीसे व्हावेत आणि दिव्य सत्याने व दिव्य मातेच्या रूपांतरणकारी चेतनेच्या कार्याने त्यांची जागा घ्यावी म्हणून त्या साऱ्या गोष्टी दिव्य शक्तिप्रत अर्पण केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 80-81)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…