समर्पण – २९
समर्पणाबद्दलच्या नुसत्या चर्चा किंवा निव्वळ कल्पना किंवा उत्कटतेचा अभाव असलेली आत्मनिवेदनाची अर्धवट इच्छा या गोष्टी काही कामाच्या नाहीत; आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तनासाठी लागणारा एक प्रकारचा जोर तिथे असला पाहिजे. केवळ मानसिक दृष्टिकोन स्वीकारून (समर्पण) ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही किंवा बाह्य पुरुषाला तो जसा आहे त्या अवस्थेत तसाच सोडून देणाऱ्या असंख्य आंतरिक अनुभवांनीदेखील ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही. या बाह्य पुरुषाने ईश्वराप्रत उन्मुख झाले पाहिजे, त्याला समर्पित झाले पाहिजे आणि परिवर्तित झाले पाहिजे. त्याने त्याचे अगदी लहानातले लहान स्पंदन, सवय, कृती यांचे समर्पण केले पाहिजे, त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट उचलून, दिव्य प्रकाशाप्रत खुली केली पाहिजे. जेणेकरून त्या गोष्टीची जुनी रूपं आणि उद्देश नाहीसे व्हावेत आणि दिव्य सत्याने व दिव्य मातेच्या रूपांतरणकारी चेतनेच्या कार्याने त्यांची जागा घ्यावी म्हणून त्या साऱ्या गोष्टी दिव्य शक्तिप्रत अर्पण केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 80-81)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…