समर्पण – २९
समर्पणाबद्दलच्या नुसत्या चर्चा किंवा निव्वळ कल्पना किंवा उत्कटतेचा अभाव असलेली आत्मनिवेदनाची अर्धवट इच्छा या गोष्टी काही कामाच्या नाहीत; आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तनासाठी लागणारा एक प्रकारचा जोर तिथे असला पाहिजे. केवळ मानसिक दृष्टिकोन स्वीकारून (समर्पण) ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही किंवा बाह्य पुरुषाला तो जसा आहे त्या अवस्थेत तसाच सोडून देणाऱ्या असंख्य आंतरिक अनुभवांनीदेखील ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही. या बाह्य पुरुषाने ईश्वराप्रत उन्मुख झाले पाहिजे, त्याला समर्पित झाले पाहिजे आणि परिवर्तित झाले पाहिजे. त्याने त्याचे अगदी लहानातले लहान स्पंदन, सवय, कृती यांचे समर्पण केले पाहिजे, त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट उचलून, दिव्य प्रकाशाप्रत खुली केली पाहिजे. जेणेकरून त्या गोष्टीची जुनी रूपं आणि उद्देश नाहीसे व्हावेत आणि दिव्य सत्याने व दिव्य मातेच्या रूपांतरणकारी चेतनेच्या कार्याने त्यांची जागा घ्यावी म्हणून त्या साऱ्या गोष्टी दिव्य शक्तिप्रत अर्पण केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 80-81)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…