ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक

समर्पण – ०८

(खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकांकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. जर या गोष्टी साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यायोगे येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समर्पण. आणि या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते ते म्हणजे खात्री, विश्वास आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य राखणे.

अभीप्सा मावळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले, तर त्याचा अर्थ असा की, साधक तेथे स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे – त्याचा अर्थ असा होईल की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा मला आता आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली तर तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?” उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत, मला जरी श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्ण सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्याबाबतीत नैराश्यदेखील काही करू शकत नाही; नैराश्य जर का आलेच तर त्यालाच अपयशी होऊन परतावे लागते.

“मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे, अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते तामसिक समर्पण असते. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एक दृष्टिकोन (तामसिक समर्पणाचा) काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा आहे, आणि अन्य दृष्टिकोन साधकाचा आहे. असा साधक सर्वोत्तम ते सारे काही करतो, परंतु जेव्हा तो काही काळासाठी निष्क्रिय होतो आणि जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीमध्ये विश्वास राखतो आणि साऱ्या गोष्टींमागे श्रीमाताजींचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. आणि त्याच्या या विश्वासामुळे तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकवार साधनेची क्रिया हाती घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 139-140)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago