समर्पण – ०६
हृदयामध्ये ईश्वराद्वारे मला सतत मार्गदर्शन मिळत आहे अशी एखाद्या व्यक्तीची समजूत असणे, हे काही अनिवार्यपणे समर्पणच असते असे नाही. समर्पण असण्यासाठी व्यक्तीने निःसंग असले पाहिजे आणि दिव्य शक्ती कोणत्या व अदिव्य शक्ती कोणत्या ते ओळखून, व्यक्तीने अदिव्य शक्तींना नकार दिला पाहिजे. अशा प्रकारे विवेक बाळगल्यानेच व्यक्ती हृदयस्थ ईश्वराप्रत खरेखुरे समर्पण करू शकते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 68)
*
जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांनाही हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ”परिस्थितीच कठीण आहे,” असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही.” तर ते योग्य आहे. आणि मग ईश्वरी दिव्यकृपा तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. दिव्य कृपेबद्दलचा जो पूर्ण विश्वास असतो त्यातून उदयाला येणाऱ्या सुहास्य वदनासारख्याच सुहास्य वदनाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…