ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

समर्पण आणि विरोधी शक्तींचा सामना

समर्पण – ०६

हृदयामध्ये ईश्वराद्वारे मला सतत मार्गदर्शन मिळत आहे अशी एखाद्या व्यक्तीची समजूत असणे, हे काही अनिवार्यपणे समर्पणच असते असे नाही. समर्पण असण्यासाठी व्यक्तीने निःसंग असले पाहिजे आणि दिव्य शक्ती कोणत्या व अदिव्य शक्ती कोणत्या ते ओळखून, व्यक्तीने अदिव्य शक्तींना नकार दिला पाहिजे. अशा प्रकारे विवेक बाळगल्यानेच व्यक्ती हृदयस्थ ईश्वराप्रत खरेखुरे समर्पण करू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 68)

*

जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांनाही हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ”परिस्थितीच कठीण आहे,” असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही.” तर ते योग्य आहे. आणि मग ईश्वरी दिव्यकृपा तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. दिव्य कृपेबद्दलचा जो पूर्ण विश्वास असतो त्यातून उदयाला येणाऱ्या सुहास्य वदनासारख्याच सुहास्य वदनाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago