मानसिक परिपूर्णत्व – २०
(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)
तुमच्यासाठी या पृथ्वीवर करण्याजोगी हीच एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे, अमुक अमुक गोष्ट करावयाची आहे हे एकदाच कायमचे ठरवून टाका ; मग बाकी भूकंप, ढासळती सभ्यता… इ. इ. बाह्य गोष्टी आहेतच. आणखी असे की, जी गोष्ट तुम्ही करणे आवश्यक आहे, ती तुम्हाला करता यावी म्हणून तुमच्या साहाय्यासाठी एक गोष्टदेखील पाठविलेली आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही ठरविलेली ती गोष्ट अवघड आहे, मार्ग दूरवरचा आहे आणि त्यामानाने देण्यात आलेले प्रोत्साहन अल्प आहे पण म्हणून काय झाले? एवढी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी मिळावी किंवा एकतर त्यात अगदी वेगाने यश प्राप्त व्हावे, नाहीतर नकोच, अशी अपेक्षा तुम्ही का बाळगता? अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्यास सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल.
…यशाचा मूलमंत्र, विजयाचा निर्धार, दृढ संकल्प कायम राखणे हीच एक गोष्ट केली पाहिजे. अशक्यता अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही. हां, अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काही नाही. व्यक्तीने एकदा का अमुक एक गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होतेच.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 115-116)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…