दिव्य पावित्र्य, विशालता, प्रकाश, स्वातंत्र्य, सत्ता, सामर्थ्य, आनंद, प्रेम, मांगल्य, ऐक्य, सौंदर्य या गुणांची आम्हांमध्ये वाढ होण्यास साह्यभूत होणारे जे काही, ते म्हणजे धर्म होय.
या धर्माच्या विरुद्ध त्याची छाया म्हणजे धर्मनिषेध हा सतत उभा असतो. वरील दिव्य गुणांच्या वाढीला विरोध करणारे, या वाढीचा नियम न मानणारे सर्व काही धर्माच्या विरुद्ध उभे असते.
आपल्यातील दिव्य मूल्यांचे रहस्य जी वस्तु स्वत:च्या ठिकाणी दाबून ठेवीत आहे, प्रकट करू इच्छित नाही, जी उलट, विकृतीचे आणि विरोधाचे रूप घेत आहे, अशुद्धता, संकुचितता, दास्य, अंधकार, दुबळेपणा, दुष्टपणा, विसंवाद, दुःख, भेद आणि दुही यांचे रूप घेऊन जी पुढे होत आहे, जी वस्तु किळसवाण्या रानटी स्वरूपाची आहे, थोडक्यात जे काही, प्रगतिशील मानव प्रगती करताना, मागे टाकून देणेच भाग आहे ते सर्व, वर सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध उभे असते. धर्माच्या विरुद्ध उभे असणारे जे काही, त्याला अधर्म असे नाव आहे.
अधर्म हा धर्मावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो, धर्माला मागे ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अधर्म म्हणजे प्रतिगामी शक्ती होय. पाप, अज्ञान, अंधार यांचा उठाव अधर्मांतून होतो. धर्म आणि अधर्म यांजमध्ये सतत झगडा चालू असतो. कधी अधर्म विजयी होतो, कधी धर्म विजयी होतो. कधी उन्नतीच्या शक्ती सत्ता गाजवतात, कधी अवनतीच्या शक्ती सत्ता गाजवतात.
वेदांमध्ये वरील गोष्टी देव आणि दानव ह्या प्रतिकांद्वारे व्यक्त झाल्या आहेत. प्रकाशाचे व अनंताचे पुत्र आणि अंधाराची व भेदात्मकतेची मुले ह्यांच्यातील हा झगडा आहे.
ह्याच त्या गोष्टी आहेत ज्यामधून, अवतारासाठी आवश्यक अशी परिस्थिती आणि अवताराचे कार्य निर्धारित होते.
– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…