ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

दिव्य पावित्र्य, विशालता, प्रकाश, स्वातंत्र्य, सत्ता, सामर्थ्य, आनंद, प्रेम, मांगल्य, ऐक्य, सौंदर्य या गुणांची आम्हांमध्ये वाढ होण्यास साह्यभूत होणारे जे काही, ते म्हणजे धर्म होय.

या धर्माच्या विरुद्ध त्याची छाया म्हणजे धर्मनिषेध हा सतत उभा असतो. वरील दिव्य गुणांच्या वाढीला विरोध करणारे, या वाढीचा नियम न मानणारे सर्व काही धर्माच्या विरुद्ध उभे असते.

आपल्यातील दिव्य मूल्यांचे रहस्य जी वस्तु स्वत:च्या ठिकाणी दाबून ठेवीत आहे, प्रकट करू इच्छित नाही, जी उलट, विकृतीचे आणि विरोधाचे रूप घेत आहे, अशुद्धता, संकुचितता, दास्य, अंधकार, दुबळेपणा, दुष्टपणा, विसंवाद, दुःख, भेद आणि दुही यांचे रूप घेऊन जी पुढे होत आहे, जी वस्तु किळसवाण्या रानटी स्वरूपाची आहे, थोडक्यात जे काही, प्रगतिशील मानव प्रगती करताना, मागे टाकून देणेच भाग आहे ते सर्व, वर सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध उभे असते. धर्माच्या विरुद्ध उभे असणारे जे काही, त्याला अधर्म असे नाव आहे.

अधर्म हा धर्मावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो, धर्माला मागे ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अधर्म म्हणजे प्रतिगामी शक्ती होय. पाप, अज्ञान, अंधार यांचा उठाव अधर्मांतून होतो. धर्म आणि अधर्म यांजमध्ये सतत झगडा चालू असतो. कधी अधर्म विजयी होतो, कधी धर्म विजयी होतो. कधी उन्नतीच्या शक्ती सत्ता गाजवतात, कधी अवनतीच्या शक्ती सत्ता गाजवतात.

वेदांमध्ये वरील गोष्टी देव आणि दानव ह्या प्रतिकांद्वारे व्यक्त झाल्या आहेत. प्रकाशाचे व अनंताचे पुत्र आणि अंधाराची व भेदात्मकतेची मुले ह्यांच्यातील हा झगडा आहे.

ह्याच त्या गोष्टी आहेत ज्यामधून, अवतारासाठी आवश्यक अशी परिस्थिती आणि अवताराचे कार्य निर्धारित होते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

18 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago