(श्रीअरविंद यांना त्यांच्या शिष्याने एक प्रश्न विचारला, त्याला श्रीअरविंद यांनी जे उत्तर दिले आहे ते उद्बोधक आहे.)
चंपकलाल : काही दिवसांपूर्वी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला असे दिसले की, मी ज्या मार्गाने चाललो होतो तो मार्ग खूप लांबचा आणि खडतर होता. त्या मार्गाला अनेक फाटे फुटले होते आणि त्यामुळे मी गोंधळून गेलो होतो. खूप प्रयत्न करूनदेखील मला माझा मार्ग सापडत नव्हता. शेवटी मी वर पाहिले. मला तेथे खूप उंचावर श्रीमाताजी दिसल्या. त्यांनी तेथून माझ्याकडे एक दोरी पाठविली. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की, ती दोरी नाही तर ऊर्ध्व दिशेने थेट जाणारा एक धवलशुभ्र, तेजोमय प्रकाश आहे. तेव्हा मला जाणीव झाली की, इकडे तिकडे धडपड करत बसण्यापेक्षा मी सरळ वरच पाहायला हवे होते कारण तेथून तो रस्ता सरळ वरच जात होता. या स्वप्नाचा अर्थ काय?
श्रीअरविंद : व्यक्ती उच्चतर चेतनेकडे वळण्यापूर्वी आणि तिने श्रीमाताजींचा धवलशुभ्र प्रकाशाचा मार्ग अनुसरण्यापूर्वी तिची मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्यादवारे जी अवघड अशी धडपड चालू असते त्याचे ते प्रतीक आहे – नंतर मात्र (श्रीमाताजींच्या धवलशुभ्र प्रकाशाकडे वळल्यानंतर) मार्ग सरळ आणि तेजोमय बनतो.
(Champaklal Speaks: 361-362)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…