ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये हिंदु समाजाने नवीन विश्वात्मक मानदंडाच्या प्रस्थापनेसाठी पुढाकार घ्यावयास हवा. हिंदु असल्यामुळे आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या माध्यमातूनच आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आपला स्वत:चा असा एक मानदंड आहे की, जो एकाचवेळी विश्वात्मक आहे आणि व्यक्तिगत असाही आहे. शाश्वत धर्म, हा नेहमीच भारताचा आधार राहिलेला आहे; तो चिरस्थायी असून भारतामध्ये अंगभूत आहे; अशा परिवर्तनशील आणि बहुरूप धारण करणाऱ्या गोष्टीला आपण हिंदुधर्म म्हणतो.

जिथे तुम्ही एखाद्या खडकामध्ये रुतून बसणाऱ्या शिंपल्यासारखे चिकटून राहता, तो धर्म असत नाही; धर्म म्हणजे काय हे समजून न घेता, न पाहता त्यात उडी मारणे हाही धर्म असू शकत नाही.

शाश्वत धर्म म्हणजे आपल्या आंतरिक जीवनामध्ये आणि आपल्या बाह्य अस्तित्वामध्ये, तसेच व्यक्तीप्रमाणेच समाजातदेखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. ‘एशा धर्म: सनातन:।’

…..ईश्वर जो मूलतः सच्चिदानंद आहे, त्याचे आविष्करण म्हणजे सत्य, प्रेम, शक्ती होय. जे काही सत्याला आणि वस्तुतत्त्वाला धरून आहे, सुसंगत आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे माणसांमधील प्रेम वाढीस लागते, ज्या कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीमध्ये, राष्ट्रामध्ये, वंशामध्ये सामर्थ्य निर्माण होते त्या गोष्टी दैवी होत, हा आहे शाश्वत धर्म आणि हे हिंदु शास्त्र आहे.

एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे की, ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे, तो एकमुखी नाही. आपल्या प्रेमाने आपल्याला दुबळे, अंध वा अविवेकी बनविता उपयोगी नाही; आपल्या शक्तिसामर्थ्याने आपल्याला कठोर व कोपिष्ट बनविता कामा नये; आपल्या तत्त्वांनी आपल्याला धर्मांध वा भावविवश बनविता कामा नये.

आपण शांतपणे, धीराने, नि:पक्षपातीपणे विचार करूया; आपण पूर्णपणे, तीव्रतेने पण विवेकीपणे प्रेम करूया; आपण सामर्थ्य, उमदेपणा आणि शक्तीनिशी कार्य करूया. असे करूनसुद्धा जर का आपल्याकडून चुका घडल्याच, तरीही ईश्वर मात्र चूक करत नाही. आपण ठरवितो आणि कृती करतो; ईश्वर त्याचे फळ ठरवितो आणि तो जे काही ठरवितो ते कल्याणकारीच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 53-54)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago