Entries by अभीप्सा मराठी मासिक

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा या सृष्टीच्या निर्मितीमधील शेवटचा टप्पा नाही किंवा मानवी शक्यतेचा देखील तो शेवटचा टप्पा नाही. मानवी मन आज बौद्धिक, वैचारिक मनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु या मनाच्या पलीकडे जात मनुष्य हा, उच्च मन (Higher Mind), प्रकाशित मन (Illumined Mind), अंतःस्फूर्त […]

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचारधन सातत्याने, सर्वदूर प्रसृत करण्याचे प्रयत्न करत असतो. असाच आपला आणखी एक उपक्रम म्हणजे मराठी विकिपीडियामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्याविषयीच्या नोंदी. ‘मराठी विकिपीडिया’ हा इंटरनेटवरील एक मुक्त ज्ञानकोश आहे, हे आपल्याला माहिती असेलच. यामध्ये ज्ञानकोशाच्या चौकटीमध्ये राहून, श्रीअरविंद […]

आंतरिक जीवन

(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित ‘सावित्री‘ या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण…) २८ जून १९६८ रोजी श्रीमाताजींनी सावित्रीमधील काही काव्यपंक्तींचे वाचन केले आणि त्याचे विवरण केले; मी ते ध्वनिमुद्रित करून घेतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले आणि मला ध्यान करण्यास सांगितले. मी डोळे मिटते न […]

विश्व आणि गुरूकिल्ली

श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याला विचारत असत, “प्रथम आम्हाला हे सांगा की, हे विश्व अस्तित्वात का आहे?” तो उत्तर देत असे, “त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?” त्यावर लोक म्हणत असत, “पण हे विश्व आत्ता जसे आहे, […]

काही आठवणी

श्री अरविंद एक आठवण सांगत आहेत… वीस वर्षांपूर्वी नेव्हिनसन (१९०७ साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले एक ब्रिटिश पत्रकार) यांनी घाबरून जाऊन माझ्याविषयी एक विधान केले होते, “भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष – कधीही न हसणारा माणूस.” त्यांनी त्यामध्ये एका वाक्याची भर घालायला हवी होती, “जो नेहमी हास्यविनोद करत असतो.” पण माझा […]

कालची स्वप्नं – उद्याचे वास्तव

मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते. मात्र, बरेचदा मोठी माणसं त्यांना जीवनाचा जो कटू अनुभव आलेला असतो, त्या आधारे मुलांच्या या आदर्शवादी स्वप्नांवर पाणी फिरवतात. पण तसे केल्याने मुलं अशी आदर्शवादी स्वप्नं पाहणेच सोडून देण्याची शक्यता असते. उलट, लहानपणीच्या स्वप्नांना रुजू दिले तर पुढे मोठेपणी ती […]

आशावादी विचारांचे सामर्थ्य

कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते. त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची […]

प्राण्यांवर प्रभुत्व मिळविण्याची युक्ती

माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात सांगितले की अशा वेळी त्याला नेहमीच एका ढाण्या वाघाशी सामना करावा लागत असे आणि त्यामुळे मग त्याची ती सारी रात्र बेचैनीत जात असे. मी त्याला त्याची सगळी भीती काढून टाकायला सांगितली. आणि “सरळ त्या श्वापदाकडे […]

प्रास्ताविक

आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक असतात त्यापैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा (sincerity). आपण व्यवहारात वावरत असताना ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो तो प्रामाणिकपणा आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी ज्याचे प्रतिपादन करतात, तो प्रामाणिकपणा; या दोन्हीमध्ये काही साम्य-भेद आहेत का, हे लक्षात घेणे महत्त्वाचे […]

नैराश्यापासून सुटका – ०१

नैराश्यापासून सुटका – ०१ जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद […]