श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याला विचारत असत, “प्रथम आम्हाला हे सांगा की, हे विश्व अस्तित्वात का आहे?”
तो उत्तर देत असे, “त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?”
त्यावर लोक म्हणत असत, “पण हे विश्व आत्ता जसे आहे, ते तसेच का आहे?”
त्याचे उत्तर ठरलेले असे. तो म्हणत असे की, “आहे हे असे आहे, त्याने तुम्हाला काय फरक पडतो ?”
मग त्यावर लोकं म्हणत असत, “आम्हाला तरी हे काही समाधानकारक वाटत नाही.“
(हा किस्सा सांगून झाल्यावर श्रीमाताजी पुढे म्हणतात) …तर ज्यांना हे विश्व समाधानकारक वाटत नाही, त्यांना मी असे म्हणेन की, ”गोष्टी जशा आहेत तशाच आहेत. तुम्ही करण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही काम करायला सुरूवात करा. ते समाधानकारक वाटावे, ते चांगले व्हावे यासाठीचा मार्ग तुम्ही शोधून काढा. येथे काहीतरी काम करण्यासारखे आहे. काम करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की, ते किती रोचक आहे. तुम्ही ज्या द्रव्याने बनला आहात त्या, एका द्रव्याच्या छोट्या समुच्चयाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. अंतरंगामध्ये प्रवेश करा आणि गुरूकिल्ली शोधून काढा. तुम्हाला केवळ अंतरंगामध्ये आत खोलवर जायचे आहे. “ते तुमच्या फारच आवाक्याबाहेरचे आहे, ते तुमच्यापेक्षा खूपच विशाल आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्या छोट्याशा व्यक्तित्वाच्या अंतरंगात प्रवेश करा म्हणजे मग, सर्व द्वारे खुली करणारी एक गुरु किल्ली तुम्हाला आतमध्ये सापडेल.”
– श्रीमाताजी (CWM 05 : 39-40)
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…