जीवन जगण्याचे शास्त्र – १८
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
जे मन अस्वस्थतेपासून, त्रासापासून मुक्त आहे; जे स्थिर, प्रकाशमान, आनंदी आणि उत्साही आहे; परिणामत: जे तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीप्रत खुले आहे, असे (अविचल) मन मला येथे अभिप्रेत आहे.
त्रस्त करणारे विचार, चुकीच्या भावभावना, कल्पनांचा गोंधळ, दुख:कारक गतिप्रवृत्ती यांच्या नेहमी होणाऱ्या आक्रमणापासून सुटका करून घेणे ही गोष्ट महत्त्वाची असते. या गोष्टींमुळे तुमची प्रकृती प्रक्षुब्ध होते, त्यावर एक प्रकारचे सावट येते आणि त्यामुळे ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करणे अधिक कठीण जाते. पण तेच मन जर का अविचल असेल, शांतिपूर्ण असेल तर, ईश्वरी शक्ती अधिक सहजतेने, सुकरतेने कार्य करू शकते.
तुमच्यामधील ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडविणे आवश्यकच आहे, त्या गोष्टींकडे अस्वस्थ न होता किंवा निराश न होता पाहणे तुम्हाला जमले पाहिजे; म्हणजे मग ते परिवर्तन अधिक सहजतेने होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 160-161)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…