श्रीमाताजी आणि समीपता – १९
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
साधक : श्रीमाताजींच्या नुसत्या दर्शनानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव (psychic feeling) आहे.
साधक : श्रीमाताजींच्या स्मरणानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : श्रीमाताजींच्या विरोधात कोणी काही बोललेले ऐकले की काळजाला घरं पडतात, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या खूप दूर असूनसुद्धा, श्रीमाताजींचे अस्तित्व हृदयामध्ये अनुभवास येते, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?
श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.
साधक : मी आंतरात्मिक प्रेमाच्या पूर्ण स्थितीमध्ये आहे हे मला कसे जाणता येईल?
श्रीअरविंद : अहंकाराचे अस्तित्व नसणे, शुद्ध भक्ती, आणि ईश्वराप्रति शरणागतता आणि समर्पण यांद्वारे ते जाणून घेता येईल.
*
साधक : जेव्हा सारे काही स्थिर, आणि शांत असते तेव्हा मला माझ्या हृदयात खोलवर असे काहीतरी अनुभवास येते, अंतरंगातून सातत्याने सर्वांसाठी समानतेने एक प्रकारची अतिशय मधुर अशी भावना उचंबळून वर येते. आणि ती सातत्याने श्रीमाताजींपाशी जाऊन पोहोचते. ईश्वराबरोबर असलेल्या एका मधुर नात्याची जाणीव त्यामध्ये असते. त्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्व अगदी मृदुमुलायम होऊन जाते; ते स्थिरचित्त, शांत, मधुर शांतीने आणि समाधानाने भरून जाते.
श्रीअरविंद : याला म्हणतात ‘आंतरात्मिक प्रेम’! (psychic love.)
– श्रीअरविंद (CWSA 32 : 466-467)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…