श्रीमाताजी आणि समीपता – २०
साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत.
श्रीअरविंद : श्रीमाताजी या फक्त अतिमानसिक स्तरावरच नाहीत तर त्या सर्व स्तरांवर असतात. आणि विशेषतः त्या आंतरात्मिक भागामध्ये (अंतःकरणामध्ये) सर्वांच्या अगदी निकट असतात, आणि म्हणून जेव्हा तो भाग खुला होतो तेव्हा साहजिकपणे ही निकटतेची भावना जागी होते.
*
साधक : मी ज्या ज्या वेळी श्रीमाताजींचे दर्शन घेतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेम आणि आनंद का जाणवत नाही?
श्रीअरविंद : प्रेम आणि आनंद या गोष्टी अंतरात्म्याच्या (psychic) अग्रभागी येण्यावर अवलंबून असतात.
*
साधक : दोन दिवस माझ्या मनात श्रीमाताजींबद्दल आणि तुमच्याबद्दल अगदी उत्कट प्रेम दाटून आले होते, माझे संपूर्ण अस्तित्व त्या प्रेमाने भारून गेले होते. आणि नंतर मात्र त्याचा परिणाम अंशतःच टिकून राहिला. म्हणजे तुमच्याबद्दल आणि श्रीमाताजींबद्दल उत्कट आणि अपार आदर आणि कोणत्याही ऐहिक सुखाने मिळणार नाही असा आनंद तेवढा शिल्लक राहिला.
श्रीअरविंद : अर्थातच तो आनंद आंतरात्मिक (psychic) होता.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…