श्रीमाताजी आणि समीपता – २०
साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत.
श्रीअरविंद : श्रीमाताजी या फक्त अतिमानसिक स्तरावरच नाहीत तर त्या सर्व स्तरांवर असतात. आणि विशेषतः त्या आंतरात्मिक भागामध्ये (अंतःकरणामध्ये) सर्वांच्या अगदी निकट असतात, आणि म्हणून जेव्हा तो भाग खुला होतो तेव्हा साहजिकपणे ही निकटतेची भावना जागी होते.
*
साधक : मी ज्या ज्या वेळी श्रीमाताजींचे दर्शन घेतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेम आणि आनंद का जाणवत नाही?
श्रीअरविंद : प्रेम आणि आनंद या गोष्टी अंतरात्म्याच्या (psychic) अग्रभागी येण्यावर अवलंबून असतात.
*
साधक : दोन दिवस माझ्या मनात श्रीमाताजींबद्दल आणि तुमच्याबद्दल अगदी उत्कट प्रेम दाटून आले होते, माझे संपूर्ण अस्तित्व त्या प्रेमाने भारून गेले होते. आणि नंतर मात्र त्याचा परिणाम अंशतःच टिकून राहिला. म्हणजे तुमच्याबद्दल आणि श्रीमाताजींबद्दल उत्कट आणि अपार आदर आणि कोणत्याही ऐहिक सुखाने मिळणार नाही असा आनंद तेवढा शिल्लक राहिला.
श्रीअरविंद : अर्थातच तो आनंद आंतरात्मिक (psychic) होता.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…