साधना, योग आणि रूपांतरण – १०७
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
…कर्म करत असताना ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचे कामातील लक्ष विचलित होते, मात्र ज्याला तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही झाली केवळ एक पहिली प्रक्रिया; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘दिव्य उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला होऊ शकली असेल, किंवा श्रीमाताजींची शक्तीच कर्म करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली असेल तर मग, कर्म करत असताना ईश-स्मरणाऐवजी, आपोआप ईश्वराशी नित्य एकत्व पावण्यास तसेच योग-साक्षात्कारास सुरुवात झाली आहे असे समजा.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…