ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

हिंदुधर्माला असलेली व्यापक जाण

भारत – एक दर्शन १७

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती, आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचे पारलौकिक जगताच्या सत्याशी व ‘अनंता’च्या सत्याशी योग्य नाते त्याला प्रस्थापित करता आले तर हिंदुधर्म समाधानी होत असे. दुसरी एक गोष्ट हिंदुधर्म जाणत होता की, धर्म केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना वास्तविकता म्हणून उपयोगात आणायचा असेल तर, त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोहोचली पाहिजे; ती केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांपर्यंत पोहोचणे पुरेसे नाही, तर ती अस्तित्वाच्या इतर अंगांपर्यंत पोहोचणे देखील आवश्यक आहे; कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांच्यापर्यंतही ती हाक पोहोचली पाहिजे. एवढेच नव्हे तर, अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोहोचली पाहिजे. ही सर्व अंग धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत.

धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे नेले पाहिजे, आणि त्या वाटचालीमध्ये त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे पण असे करत असताना, आपल्या जटील प्रकृतीच्या उर्वरित अंगांना ‘ईश्वरत्वा’कडे घेऊन जाण्याबाबत दुर्लक्ष करणे त्याला परवडण्यासारखे नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, त्याला जे जाणवत असेल त्या माध्यमातूनच, हात देऊन धर्माने त्याला आध्यात्मिक बनवले पाहिजे, अध्यात्मपरायण बनवले पाहिजे; सत्य आणि जिवंत शक्तीचे तो जोवर आकलन करू शकत नाही तोवर ती गोष्ट त्याच्यावर लादता कामा नये. प्रत्यक्ष-ज्ञानवादी बुद्धी (positivist intelligence), हिंदुधर्मातील ज्या गोष्टींना अतार्किक वा तर्कविरोधी असे संबोधते, लांछन लावते त्या सर्व गोष्टींचा हा खरा अर्थ आहे आणि हे त्या गोष्टींचे खरे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 147-148]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago