भारत – एक दर्शन १६
(भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.)
भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो किंवा सर्व आंतरिक व बाह्य ‘प्रकृती’चा भेद करून संपर्क साधता येतो, त्याचप्रमाणे ‘तो ईश्वर’ प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे त्याच्या स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो. कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ‘ईश्वरी अस्तित्वा’शी, ‘सत् तत्त्वा’शी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ‘ईश्वरी अस्तित्वा’शी संबंधित तरी असते; ही ती अत्यंत परिणामकारक अशी तिसरी संकल्पना आहे. आपल्या मनापासून आणि प्राणापासून हे आत्म-ज्ञान दडवून ठेवणाऱ्या ‘अज्ञाना’तून आपण बाहेर पडू शकू आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ‘दिव्यत्वा’विषयी आपण जागृत होऊ शकू अशा पद्धतीने आपण जीवन जगावे, विकसित व्हावे, हे आपले ध्येय असावे हा भारतीय धर्माचा गाभा आहे. या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच ‘हिंदु’ धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणती श्रद्धा आवश्यक असेल तर हीच ती श्रद्धा होय.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 195]
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…