कर्म आराधना – ५०
भौतिक वस्तुंमध्ये चेतना असते. मनुष्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये जशी चेतना असते आणि जसा प्राण असतो तशी चेतना किंवा तसा प्राण भौतिक वस्तुंमध्ये नसतो हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्यामध्येही गुप्त रूपाने आणि खरीखुरी चेतना असते. आणि म्हणूनच आपण भौतिक वस्तुंना योग्य तो मान दिला पाहिजे आणि आपण त्यांचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे, त्यांचा गैरवापर किंवा अपव्यय करता कामा नये, त्यांचा वाटेल तसा वापर करता कामा नये; त्यांची हाताळणी निष्काळजीपणे करता कामा नये.
केवळ मनच नव्हे तर, आपली स्वतःची शारीरिक चेतना जेव्हा तिच्या अंधकारातून बाहेर पडते आणि सर्व वस्तुमात्रांच्या ठायी असलेल्या ‘एकमेवाद्वितीया’ची, सर्वत्र असलेल्या ‘ईश्वरा’चीच जेव्हा तिला जाणीव होते तेव्हा सर्व काही सचेत किंवा जिवंत असल्याची जाणीव व्यक्तीला होते.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287-288]
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…