कर्म आराधना – ४९
भौतिक गोष्टींमधील सुव्यवस्था, सुसंवाद आणि संघटन या बाबी कार्यक्षमता आणि परिपूर्णता यांचा आवश्यक असा भाग असतात आणि त्यामुळे, साधनाला जे कोणते कार्य दिले जाते ते करण्यासाठी ते साधन अधिक सुयोग्य बनते.
*
भौतिक गोष्टींना तुच्छ लेखता कामा नये – कारण त्यांच्याविना या जडभौतिक विश्वामध्ये आविष्करणच होऊ शकणार नाही.
*
भौतिक वस्तुंना जीवन असते आणि त्यांना त्यांचे स्वत:चे असे एक मूल्य असते, ते मूल्य त्यांच्या किमतीवर अवलंबून नसते. भौतिक वस्तुंचा आदर करणे आणि त्यांचा काळजीपूर्वक व काटेकोरपणे वापर करणे हा योगसाधनेचाच एक भाग असतो, कारण त्याशिवाय जडभौतिकावर प्रभुत्व मिळविणे शक्य नाही.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 276, 287]
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…