भांडणतंटे आणि संघर्ष हे योगाची बैठक नसल्याचे लक्षण आहे आणि ज्यांना खरोखरच योगसाधना करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी या गोष्टींच्या वर उठायला शिकले पाहिजे. कलह, वादंग वा भांडणाचे कोणतेही कारण नसताना संघर्ष न करणे हे अगदीच सोपे आहे; पण जेव्हा असे कोणतेतरी कारण असते आणि दुसरी बाजू अगदी असह्य असते किंवा अविवेकी असते तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या प्राणिक प्रकृतीच्या वर उठण्याची संधी मिळते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…