मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे.
*
व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते.
*
जेव्हा तुम्ही भांडणाला सुरुवात करता तेव्हा, तुम्ही जणू काही ईश्वरी कार्याविरोधात युद्ध पुकारता.
*
हो, भांडणे करणे ही अगदी दुःखद गोष्ट आहे – त्यांच्यामुळे कार्यामध्ये भयंकर बाधा येते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच अधिक कठीण होऊन जाते.
*
व्यक्तीला स्वतःच्या दोषांबद्दल वाईट वाटणे हे, एक वेळ गरज पडल्यास, स्वतःच्या दोषांमध्ये सुधारणा करण्याच्या संकल्पाचे दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
परंतु इतरांच्या दुराचरणामुळे व्यक्तीला स्वतःला अपमानित झाल्यासारखे वाटणे, याचा आध्यात्मिक जीवनाशी किंवा ईश्वराच्या सेवेशी काही संबंध नाही.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 262-264)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…