मानवी स्नेहसंबंधांचे मूल्य काहीही असले तरी त्याचे त्याचे स्वतःचे असे एक स्थान असते कारण दिखाऊपणापेक्षा खरेपणाला, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाला, मानवापेक्षा ईश्वराला पसंती देण्याइतपत जोवर चैत्य पुरुषाची (psychic being) तयारी होत नाही तोवर, त्याला आवश्यक असणारे सारे भावनिक अनुभव, या स्नेहसंबंधांमधून त्याला मिळत असतात. चेतना जशी उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आवश्यकता असते; तसेच हृदयाच्या साऱ्या कृतीदेखील उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आणि त्यांचा पाया व त्यांचे स्वरूप बदलण्याची आवश्यकता असते. सारे जीवन आणि चेतना ही ईश्वरामध्ये सुप्रतिष्ठित करणे म्हणजे योग होय, त्यामुळे प्रेम व स्नेह यांची मुळेसुद्धा ईश्वरामध्ये रुजली पाहिजेत तसेच ईश्वराशी आध्यात्मिक व आंतरात्मिक एकत्व हे त्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. इतर साऱ्या गोष्टी बाजूला सारून, प्रथमतः ईश्वराकडे पोहोचणे किंवा केवळ ईश्वराचाच शोध घेणे हा या बदलांच्या दिशेने घेऊन जाणारा सरळ मार्ग असतो. प्रेम हे अप्रीतीकडे किंवा थंड निर्ममतेकडे वळले पाहिजे असा याचा अर्थ नाही; तर त्यामध्ये आसक्ती असता कामा नये, असा याचा अर्थ आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296-297)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…