ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योग आणि मानवी नातेसंबंध – ०७

मानवी स्नेहसंबंधांचे मूल्य काहीही असले तरी त्याचे त्याचे स्वतःचे असे एक स्थान असते कारण दिखाऊपणापेक्षा खरेपणाला, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाला, मानवापेक्षा ईश्वराला पसंती देण्याइतपत जोवर चैत्य पुरुषाची (psychic being) तयारी होत नाही तोवर, त्याला आवश्यक असणारे सारे भावनिक अनुभव, या स्नेहसंबंधांमधून त्याला मिळत असतात. चेतना जशी उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आवश्यकता असते; तसेच हृदयाच्या साऱ्या कृतीदेखील उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आणि त्यांचा पाया व त्यांचे स्वरूप बदलण्याची आवश्यकता असते. सारे जीवन आणि चेतना ही ईश्वरामध्ये सुप्रतिष्ठित करणे म्हणजे योग होय, त्यामुळे प्रेम व स्नेह यांची मुळेसुद्धा ईश्वरामध्ये रुजली पाहिजेत तसेच ईश्वराशी आध्यात्मिक व आंतरात्मिक एकत्व हे त्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. इतर साऱ्या गोष्टी बाजूला सारून, प्रथमतः ईश्वराकडे पोहोचणे किंवा केवळ ईश्वराचाच शोध घेणे हा या बदलांच्या दिशेने घेऊन जाणारा सरळ मार्ग असतो. प्रेम हे अप्रीतीकडे किंवा थंड निर्ममतेकडे वळले पाहिजे असा याचा अर्थ नाही; तर त्यामध्ये आसक्ती असता कामा नये, असा याचा अर्थ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296-297)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

19 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago