प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का?
श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते.
प्रश्न : मला समजले नाही.
श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना जर सामान्य माणसाची असेल तर तुम्ही सामान्य माणसासारखेच प्रेम कराल. तुमची चेतना ही जर अभिजनाची असेल तर तुमचे प्रेमदेखील उच्च व्यक्तीला साजेसेच असेल आणि तुमच्याकडे जर देवाची चेतना असेल तर तुमचे प्रेमदेखील देवासारखेच असेल. हे अगदी साधेसरळ आहे. आणि म्हणून, प्रगतीसाठी आणि आंतरिक रूपांतरणासाठी प्रयत्नपूर्वक, अभीप्सेच्या आणि विकासाच्या द्वारे, जर तुम्ही एका चेतनेमधून दुसऱ्या चेतनेमध्ये जाऊन पोहोचलात आणि तुमची चेतना जर अधिकाधिक विशाल होत गेली तर तुम्हाला येणारा प्रेमाचा अनुभव हा अधिकाधिक विशाल होत जाईल, हे अगदी उघड आहे.
समजा, तुम्ही अगदी स्फटिकवत स्वच्छ अशा खडकांमधून येणारे अगदी शुद्ध असे पाणी घेतलेत आणि ते एका बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये साठवलेत आणि त्या भांड्यामध्ये मात्र तळाशी काहीसा किंवा पुष्कळसा किंवा अगदी मोठ्या प्रमाणात गाळ असेल; तर जे पाणी खडकांमधून आले होते, ते आता अगदी जसेच्या तसेच शुद्ध आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यामध्ये त्या भांड्यामधील पुष्कळ गोष्टी मिसळल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे ते पाणी आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. अशा प्रकारे, प्रेम हे गाभ्यामध्ये अतीव शुद्ध, स्फटिकवत आणि परिपूर्ण अशी गोष्ट असते. मानवी चेतनेमध्ये असताना त्या प्रेमात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्या गाळाच्या प्रमाणात प्रेमदेखील अधिकाधिक गढूळ होत जाते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 102-103)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…