प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का?
श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते.
प्रश्न : मला समजले नाही.
श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना जर सामान्य माणसाची असेल तर तुम्ही सामान्य माणसासारखेच प्रेम कराल. तुमची चेतना ही जर अभिजनाची असेल तर तुमचे प्रेमदेखील उच्च व्यक्तीला साजेसेच असेल आणि तुमच्याकडे जर देवाची चेतना असेल तर तुमचे प्रेमदेखील देवासारखेच असेल. हे अगदी साधेसरळ आहे. आणि म्हणून, प्रगतीसाठी आणि आंतरिक रूपांतरणासाठी प्रयत्नपूर्वक, अभीप्सेच्या आणि विकासाच्या द्वारे, जर तुम्ही एका चेतनेमधून दुसऱ्या चेतनेमध्ये जाऊन पोहोचलात आणि तुमची चेतना जर अधिकाधिक विशाल होत गेली तर तुम्हाला येणारा प्रेमाचा अनुभव हा अधिकाधिक विशाल होत जाईल, हे अगदी उघड आहे.
समजा, तुम्ही अगदी स्फटिकवत स्वच्छ अशा खडकांमधून येणारे अगदी शुद्ध असे पाणी घेतलेत आणि ते एका बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये साठवलेत आणि त्या भांड्यामध्ये मात्र तळाशी काहीसा किंवा पुष्कळसा किंवा अगदी मोठ्या प्रमाणात गाळ असेल; तर जे पाणी खडकांमधून आले होते, ते आता अगदी जसेच्या तसेच शुद्ध आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यामध्ये त्या भांड्यामधील पुष्कळ गोष्टी मिसळल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे ते पाणी आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. अशा प्रकारे, प्रेम हे गाभ्यामध्ये अतीव शुद्ध, स्फटिकवत आणि परिपूर्ण अशी गोष्ट असते. मानवी चेतनेमध्ये असताना त्या प्रेमात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्या गाळाच्या प्रमाणात प्रेमदेखील अधिकाधिक गढूळ होत जाते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 102-103)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…