मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१
व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त त्याची रूपे अगणित, क्षणभंगुर आणि नाशिवंत असतात – हे ज्ञान व्यक्तीने मनामध्ये सुरक्षितपणे आणि कायमस्वरूपी स्थापित केले पाहिजे आणि या प्रत्येक रूपापासून स्वतंत्र असणाऱ्या पण तरीही या सर्व रूपांमधून आविष्कृत होणाऱ्या शाश्वत जीवनाशी, व्यक्तीने स्वतःची चेतना शक्य तितकी तादात्म्य केली पाहिजे. समस्या तशीच शिल्लक असते; पण या तादात्म्यामुळे समस्येला सामोरे जाण्यासाठी अपरिहार्य असा मनोवैज्ञानिक आधार प्राप्त होतो. अगदी आंतरिक अस्तित्व जरी सर्व भीतीच्या पलीकडे जाण्याइतपत प्रदीप्त झालेले असले तरीही शरीराच्या पेशींमध्ये भीती दडून राहिलेली असते; ती धूसर, स्वाभाविक, तर्कातीत आणि बरेचदा ती अगदी अज्ञात असते. व्यक्तीने या अंधार भरल्या गहनतेमध्ये तिचा शोध घेतला पाहिजे, तिचा ताबा घेतला पाहिजे आणि तिच्यावर ज्ञानाचा आणि दृढ विश्वासाचा प्रकाश टाकला पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82-83)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…