मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२
जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट साध्य करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अशा अटी घालण्यात येतात की, ज्या अटींची परिपूर्ती अगदी मोजकी माणसंच करू शकतील. त्यामुळे मृत्युच्या भीतीवर मात करण्याची जी पद्धत अवलंबायची, ती प्रकृतीगणिक आणि चेतनेच्या अवस्थेगणिक वेगवेगळी असेल. या प्रत्येक पद्धतीमध्ये पुष्कळ विविधता आढळत असली तरीही, या पद्धतींचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते; खरे तर, प्रत्येकाने स्वतःची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…