मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२
जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट साध्य करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अशा अटी घालण्यात येतात की, ज्या अटींची परिपूर्ती अगदी मोजकी माणसंच करू शकतील. त्यामुळे मृत्युच्या भीतीवर मात करण्याची जी पद्धत अवलंबायची, ती प्रकृतीगणिक आणि चेतनेच्या अवस्थेगणिक वेगवेगळी असेल. या प्रत्येक पद्धतीमध्ये पुष्कळ विविधता आढळत असली तरीही, या पद्धतींचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते; खरे तर, प्रत्येकाने स्वतःची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…