ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध १६

…कदाचित मनुष्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो भीतीचा; ही भीती बहु-आयामी, अनेकरूपी, आत्म-विसंगत, अतार्किक, अविवेकी, बरेचदा युक्तिहीन असते. सर्व प्रकारच्या भीतींपैकी सर्वांत सूक्ष्म आणि सर्वांत चिवट अशी जर कोणती भीती असेल तर ती असते मृत्युची. या भीतीची पाळेमुळे अवचेतनेमध्ये (subconscious) खूप खोलवर रुजलेली असतात आणि तेथून ती उपटून काढणे ही गोष्ट सोपी नसते. अर्थातच ही भीती अनेक गुंतागुंतीच्या घटकांपासून बनलेली असते. या घटकांमध्ये : सुरक्षिततेची भावना असते; आणि चेतनेचे सातत्य खात्रीशीररित्या टिकून राहावे यासाठी त्याच्या संरक्षणाविषयीची चिंता असते; त्यामध्ये अज्ञातासमोर कच खाणे असते ; अदृश्य आणि अनपेक्षितपणातून उद्भवलेली अस्वस्थताही त्यामध्ये असते; आणि कदाचित या साऱ्यामागे, पेशींमध्ये खोलवर दडलेली अशी एक सहजप्रेरणा असते की, मृत्यू ही काही अटळ गोष्ट नाही आणि जर काही अटी पाळल्या तर त्यावर विजय प्राप्त करता येतो. परंतु खरे सांगावयाचे तर, विजय मिळविण्यामध्ये एक प्रमुख अडथळा हा या भीतीचाच असतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago