अमर्त्यत्व म्हणजे काय ?
अमर्त्यत्व म्हणजे मृत्युनंतर मानसिक व्यक्तिमत्त्व टिकून राहणे नव्हे, (अर्थात तेही खरंच आहे) तर अमर्त्यत्व म्हणजे, शरीर हे ज्याचे केवळ एक साधन असते, एक छाया असते त्या अजन्मा आणि मृत्युहीन असलेल्या आत्म्याचे जागृत आधिपत्य असते. (श्रीअरविंदलिखित या वचनावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात) …अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्युरहित जीवन होय, जे शरीरापासून पूर्णतः स्वतंत्र असते. हे आत्म्याचे जीवन असते, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अस्तित्वाचे ते जीवन असते आणि ते विश्वात्मक आत्म्यापासून विभक्त नसते. आणि हे जे मूलभूत अस्तित्व असते त्याला आपल्या विश्वात्मक आत्म्याशी असलेल्या एकत्वाची जाण असते; वास्तविक हे अस्तित्व म्हणजे साक्षात या विश्वात्मक आत्म्याचे व्यक्तिरूपाने अभिव्यक्त झालेले व्यक्तिमत्त्व असते आणि त्याला आदी नसतो किंवा अंतही नसतो, त्याला जन्म नसतो, मृत्युही नसतो, ते शाश्वतपणे अस्तित्वात असते आणि ते अमर्त्य असते. आपण जेव्हा या आत्म्याविषयी पूर्णपणे जागृत होतो तेव्हा आपण त्याच्या शाश्वत जीवनामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे आपणही अमर्त्य होतो.
– श्रीमाताजी
(CWM 10 : 27-28)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…