निरोगी आयुष्य पुन्हा प्राप्त करून घेणे – अशा प्रकारच्या स्वयंसूचना म्हणजे मानसिक रूपांवरील खरीखुरी श्रद्धा होय. त्याचा परिणाम अबोध मनावर आणि अवचेतन मनावर देखील होतो. अबोध मनामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती कार्यरत होतात, त्याच्या गूढ शक्ती, ज्यांचे शरीरावर चांगला परिणाम होतील असे विचार, अशा इच्छा निर्माण करतात किंवा जागृत शक्तीदेखील उदयास आणतात. अवचेतनेमध्ये स्वयंसूचनांचा परिणाम होतो आणि आरोग्याच्या पुन:प्राप्तीला रोखणाऱ्या आजारपणाच्या आणि मृत्युच्या (प्रकट वा अप्रकट) सूचनांना त्या अटकाव करतात किंवा त्यांना शांत करतात. मन, प्राण आणि शारीर चेतनेमधील विरोधी सूचनांशी दोन हात करण्यासाठी सुद्धा अशा स्वयंसूचनांची मदत होते. हे सारे जेव्हा पूर्णपणाने केले जाते किंवा समग्रतेने केले जाते तेव्हा लक्षणीय परिणाम दिसून येतात.
– श्रीअरविंद
(CWSA 31:559)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…