जेव्हा ज्ञानामुळे शांत झालेले, प्रेमाने काठोकाठ भरलेले हृदय परमानंदित होते आणि सामर्थ्याने स्पंदित होऊ लागते; जेव्हा शक्तीच्या सामर्थ्यशाली भुजा, विश्वासाठी आनंद आणि प्रकाशाच्या ज्योतिर्मयी पुर्णत्वामध्ये परिश्रम घेतात; जेव्हा ज्ञानाचा दीप्तिमान मेंदू, हृदयाकडून आलेल्या धूसर अंत:प्रेरणा ग्रहण करतो आणि त्या रूपांतरित करतो आणि उच्चासनस्थित अशा संकल्पशक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला स्वाधीन करतो; जो जीव सर्व विश्वाच्या एकत्वामध्ये जीवन जगत असतो आणि रुपांतरित करण्याच्या भूमिकेतूनच विश्वातील सर्व गोष्टींचा स्वीकार करत असतो, अशा त्यागी जीवाच्या अधिष्ठानावर जेव्हा हे सर्व देव, एकत्रितपणे सुप्रतिष्ठित होतात; हीच ती अवस्था असते जेव्हा मनुष्य समग्रतया स्व-अतीत होतो.
… हाच तो अतिमानवत्वाकडे जाण्याचा दिव्य मार्ग !
*
अतिमानव कोण?
मनोमय मानवी अस्तित्व भंगलेले आहे हे जाणून, जो या जडभौतिकाच्या वर उठून; वैश्विकतेने स्वत:ला भारून घेतो आणि दिव्य शक्तीसामर्थ्य, दिव्य प्रेम व आनंद आणि दिव्य ज्ञान यामध्ये देवसायुज्यत्व साधतो, तोच अतिमानव !
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 157), (CWSA 12 : 439)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…