कनिष्ठ प्रतीच्या मानवप्रजातीमध्ये मनाकडून प्राणाकडे व शरीराकडे असे अधोमुखी गुरुत्वाकर्षण असते.
साधारण प्रतीच्या मानवप्रजातीचा मुक्काम हा, प्राण व शरीराने मर्यादित केलेल्या आणि त्यांच्याकडेच लक्ष ठेवून असणाऱ्या अशा मनामध्ये असतो.
सरस अशी मानवप्रजाती ही आदर्शवत् मनोवस्थेकडे, किंवा एखाद्या विशुद्ध संकल्पनेकडे, ज्ञानाच्या साक्षात् सत्याकडे आणि अस्तित्वाच्या उत्स्फूर्त सत्याप्रत उत्थापित होते.
परमोच्च मानवप्रजाती ही दिव्य परमानंदाप्रत उन्नत होते आणि तेथून ती त्याहून वर असलेल्या केवल सत् अणि परब्रह्माकडे ऊर्ध्वगामी होते अन्यथा, तिच्या कनिष्ठ सदस्यांना हा परमानंद लाभावा; तसेच स्वत:ला आणि मानवी जीवनातील इतरांना हे दिव्यत्व लाभावे म्हणून कार्यरत राहते.
ज्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ गोलार्धामध्ये असलेला पडदा भेदला आहे; जो मानव त्याच्यामध्ये सद्यस्थितीत गुप्त असलेल्या उच्चतर वा दिव्य गोलार्धात वसती करतो, तो खरा अतिमानव आहे आणि तो या विश्वामधील क्रमश: होणाऱ्या ईश्वराच्या आत्माविष्करणाची शेवटची उत्पत्ती असेल; जडामधून चेतनेचा उदय होण्याची, ज्याला आज उत्क्रांतितत्त्व म्हणून संबोधले जाते त्याची ही शेवटची उत्पत्ती असेल.
या दिव्य अस्तित्वामध्ये, शक्तीमध्ये, प्रकाशामध्ये, आनंदामध्ये उन्नत होणे आणि त्याच्या साच्यामध्ये सर्व सांसारिक (mundane) अस्तित्व पुन्हा ओतणे, ही धर्माची सर्वोच्च अशी आकांक्षा आहे आणि हेच योगाचे व्यावहारिक ध्येय आहे. विश्वामध्ये ईश्वराचा साक्षात्कार घडविणे हे उद्दिष्ट आहे पण विश्वातीत असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय, ते साध्य होऊ शकत नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 102)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…