हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचा, अतिभौतिक जगताच्या सत्याशी व अनंताच्या सत्याशी योग्य नाते तो जर प्रस्थापित करू शकला तर तो समाधानी होत असे.
धर्म हा केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर, सर्वसामान्य लोकांना देखील सत्य म्हणून उपयोगात यावयाचा असेल तर त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोचली पाहिजे, केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांना पोचून भागणार नाही. कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांना ती हाक पोचली पाहिजे. अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोचली पाहिजे. ही सर्व अंगे धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत; ह्याचीदेखील हिंदु धर्माला जाण होती. धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे घेऊन गेले पाहिजे, मार्गात त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे हे खरे आहे, तरी आमच्या संकीर्ण प्रकृतीची बाकीची अंगेसुद्धा ईश्वराकडे धाव घेतील असेही त्याने केले पाहिजे; धर्माने त्या अंगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आणखी एक गोष्ट, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, ज्या ज्ञानाच्या व भावनेच्या अवस्थेत असेल, तेथेच, त्या अवस्थेतच त्याला धर्माने हात देऊन आध्यात्मिक केले पाहिजे, अध्यात्मपरायण केले पाहिजे; त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये. सत्य जिवंतशक्ती देखील, त्याला तशी ती दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावर लादली जाता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 20 : 147-148)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…