ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचा, अतिभौतिक जगताच्या सत्याशी व अनंताच्या सत्याशी योग्य नाते तो जर प्रस्थापित करू शकला तर तो समाधानी होत असे.

धर्म हा केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर, सर्वसामान्य लोकांना देखील सत्य म्हणून उपयोगात यावयाचा असेल तर त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोचली पाहिजे, केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांना पोचून भागणार नाही. कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांना ती हाक पोचली पाहिजे. अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोचली पाहिजे. ही सर्व अंगे धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत; ह्याचीदेखील हिंदु धर्माला जाण होती. धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे घेऊन गेले पाहिजे, मार्गात त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे हे खरे आहे, तरी आमच्या संकीर्ण प्रकृतीची बाकीची अंगेसुद्धा ईश्वराकडे धाव घेतील असेही त्याने केले पाहिजे; धर्माने त्या अंगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आणखी एक गोष्ट, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, ज्या ज्ञानाच्या व भावनेच्या अवस्थेत असेल, तेथेच, त्या अवस्थेतच त्याला धर्माने हात देऊन आध्यात्मिक केले पाहिजे, अध्यात्मपरायण केले पाहिजे; त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये. सत्य जिवंतशक्ती देखील, त्याला तशी ती दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावर लादली जाता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 147-148)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

15 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago