श्रीमाताजी आणि समीपता – २८
ईश्वरी प्रभावाशिवाय अन्य कोणतेही प्रभाव (influences) स्वीकारायचे नाहीत, ही गोष्ट साध्य करून घेण्यासारखी आहे; कारण सहसा मानवी प्रकृती ईश्वरी प्रभाव न स्वीकारता इतरच प्रभाव स्वीकारत असते. श्रीमाताजींच्या दिव्य प्रकाशाच्या आणि दिव्य शक्तीच्या एकमेव प्रभावाखाली राहिल्याने, प्रकृतीमधील जे जे काही बदलणे आवश्यक असते ते, शांतपणे व सहजतेने बदलता येऊ शकते आणि प्रकृतीमधील जे काही विकसित करणे आवश्यक असते ते, कोणत्याही अडथळ्याविना किंवा त्रासाविना विकसित करता येऊ शकते.
*
श्रीमाताजींसोबत असणाऱ्या थेट नात्याचा मार्ग तुमच्यासाठी नेहमीच खुला असतो आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा तेव्हा तो मार्ग तिथे असतोच, कारण ही गोष्ट आंतरिक अस्तित्वाशी संबंधित असते. जेव्हा कधी तुम्ही अंतरंगात खोलवर प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला ते नाते गवसेलच; मात्र त्याने पृष्ठस्तरावर येऊन, बाह्य प्रकृतीचे आणि बाह्य जीवनाचे शासन (govern) करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच तुम्ही अंतरंगामध्ये प्रविष्ट होण्यासाठी आणि साधनेमध्ये आंतरिक प्रगती करण्यासाठी काही वेळ द्यावा असे मला वाटते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 486-487)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…